महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ जाहीर झाल्यापासून राजकारणाचे खेळ जनता पाहत होती. आघाडी फुटली, युती तुटली. शेवटपर्यंत चर्चा, वाटाघाटी चालू होत्या. शेवटी आपापली ताकत स्वतंत्रपणे अजमावली. फार पूर्वीपासून प्रत्येकाची अशीच इच्छा होती. प्रचारात एकमेकांची उणीदुणी, टीका इ. सर्व प्रकार झाले. नको त्या थराला जाऊन जहरी टीकासुद्धा झाली. बहुमताचे दावे, प्रतिदावे झाले; पण जनतेने कौल दिला; आणि कुणालाही बहुमत मिळाले नाही. सत्तेसाठी चर्चा, भेटीगाठी सुरु झाल्या. मानपान, सन्मान आडवे येऊ लागले...
पूर्वी खेड्यांमध्ये शेतीविषयी, घरांविषयी आपसात भांडणे चालायची. पिढ्यानपिढ्या कोर्टात दावे चालायचे. वादी आणि प्रतिवादी कर्जबाजारी व्हायचे. शेत विकायची वेळ यायची; पण कोणीही माघार घेण्यास तयार व्हायचे नाहीत. प्रत्येकाचा बाणा असे, "शेत गेले तरी हरकत नाही; पण धुरा जाऊ द्यायचा नाही." "मोडेल पण वाकायचे नाही." अशा प्रकारात पिढी दरपिढी दुष्मनी चालू राहायची. यातून फलित एवढेच निघायचे, की दोन्ही पक्ष कंगाल व्हायचे.
काळ बदलला, शिक्षणाच्या सोयी झाल्या. शिक्षितांचे प्रमाण वाढले. विचारांत फरक पडला. पूर्वीसारखे कज्जे कमी झाले; पण राजकारण सुरु झाले. सत्तेसाठी स्पर्धा वाढली. स्वार्थ वाढला. गमावण्यापेक्षा कमावणे वाढले. कोणत्याही पद्धतीने, प्रकाराने; मग भ्रष्टाचारच शिष्टाचार झाला. तो वरपासून खालपर्यंत भिनला. त्यात कुणालाही वैषम्य वाटेनासे झाले. तत्वे, प्रामाणिकपणा, बांधिलकी लयाला गेली. जिकडे तिकडे एकच काम सुरु झाले, "भर अब्दुल्ला गुड थैली में."
जनता हे सर्व पाहत होती. आज ना उद्या फरक पडेल; असा एखादा दूत येईल, की जो, ही परिस्थिती बदलून टाकील. कमीतकमी आपल्या राहण्या-खाण्याची, कपड्या-लत्त्याची, दवापाणी-शिक्षणाची, रोजगाराची सोय करील. दुष्काळ, शेतीची नापिकी, कर्जबाजारीपणा इ. मुळे आत्महत्त्या करायची वेळ येणार नाही. पण दुर्दैव, आला दिवस जात होता, रोज सूर्य उगवत होता; पण भोग संपत नव्हते. आत्महत्त्या चालूच आहेत, स्त्रियांवरील अत्त्याचार चालूच आहेत, दलितांचे, शोषितांचे हत्त्याकांड चालूच आहे. पण इकडे लक्ष देण्यास कोणास वेळ नाही. प्रत्येकजण आपल्या खेळात मश्गुल आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून...
पूर्वी खेड्यांमध्ये शेतीविषयी, घरांविषयी आपसात भांडणे चालायची. पिढ्यानपिढ्या कोर्टात दावे चालायचे. वादी आणि प्रतिवादी कर्जबाजारी व्हायचे. शेत विकायची वेळ यायची; पण कोणीही माघार घेण्यास तयार व्हायचे नाहीत. प्रत्येकाचा बाणा असे, "शेत गेले तरी हरकत नाही; पण धुरा जाऊ द्यायचा नाही." "मोडेल पण वाकायचे नाही." अशा प्रकारात पिढी दरपिढी दुष्मनी चालू राहायची. यातून फलित एवढेच निघायचे, की दोन्ही पक्ष कंगाल व्हायचे.
काळ बदलला, शिक्षणाच्या सोयी झाल्या. शिक्षितांचे प्रमाण वाढले. विचारांत फरक पडला. पूर्वीसारखे कज्जे कमी झाले; पण राजकारण सुरु झाले. सत्तेसाठी स्पर्धा वाढली. स्वार्थ वाढला. गमावण्यापेक्षा कमावणे वाढले. कोणत्याही पद्धतीने, प्रकाराने; मग भ्रष्टाचारच शिष्टाचार झाला. तो वरपासून खालपर्यंत भिनला. त्यात कुणालाही वैषम्य वाटेनासे झाले. तत्वे, प्रामाणिकपणा, बांधिलकी लयाला गेली. जिकडे तिकडे एकच काम सुरु झाले, "भर अब्दुल्ला गुड थैली में."
जनता हे सर्व पाहत होती. आज ना उद्या फरक पडेल; असा एखादा दूत येईल, की जो, ही परिस्थिती बदलून टाकील. कमीतकमी आपल्या राहण्या-खाण्याची, कपड्या-लत्त्याची, दवापाणी-शिक्षणाची, रोजगाराची सोय करील. दुष्काळ, शेतीची नापिकी, कर्जबाजारीपणा इ. मुळे आत्महत्त्या करायची वेळ येणार नाही. पण दुर्दैव, आला दिवस जात होता, रोज सूर्य उगवत होता; पण भोग संपत नव्हते. आत्महत्त्या चालूच आहेत, स्त्रियांवरील अत्त्याचार चालूच आहेत, दलितांचे, शोषितांचे हत्त्याकांड चालूच आहे. पण इकडे लक्ष देण्यास कोणास वेळ नाही. प्रत्येकजण आपल्या खेळात मश्गुल आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून...